Monday, May 6, 2019

TLJ भाग ८

=====ती लाजते जेव्हा... पर्व २, भाग ८ =============

देसाई मंडळी जाता जाता घरात वादळ निर्माण करून गेले.

मनात प्रश्न आणि त्याचे असंख्य भावी उत्तरं, एखादी व्यक्ती आत्महत्या का करेन? तिचे आयुष्य मनासारखे .. नाही त्या पेक्षा निरस झाले तर? तिला सासुरवास होता का खूप? नक्की हुंडा मागितला असेल.... वर वर दाखववतात पैसे, खर्च आम्ही करू... पण आज हि मानसिकता तशीच, किती तरी मुली हुंडाबळी पडतात... आपली रुपाली ... नाही नाही... शिवानी ताडकण उठली, झोपच लागत नव्हती तिला. रणजित ला हलवून उठवावे म्हणून बघितले तर तो जागेवर नव्हताच... कुठे गेला म्हणून ती त्याला शोधू लागली, खोलीतून आपले केस बांधत ती बाहेर आली, अमावस्या असल्याने काळोख पसरलेला, हाताला हाथ दिसत नव्हता पण उन्हाळ्यात हि थंडगार वारं सुटलेलं, ती हाताची घडी घालून रंजीत ला बघू लागली... 

तिला व्हरांड्यात रंजीत बसलेला दिसला, ती त्याच्या जवळ गेली तर थक्क राहिली, तो सिगारेट ओढत बसला होता... ती त्याच्या वर चिडून त्याच्या हातातली सिगारेट हिसकावून बुजवत म्हणाली, "काय करतोयस? कुठून आली हि?" शिवानी प्रश्न विचारत होती पण रंजीत चे तिच्याकडे लक्ष नव्हते. ती त्याला हलवते ज्याने त्याची तंद्री तुटते, "मी काय विचारत आहे रंजीत? तुला कुठून मिळाली हि सिगारेट?"
"मला माफ कर शिवानी, अगं ते खूपच डोकं गरगरायला लागलं होत, रमेश म्हणाला ऐक ओढ बरं वाटेल म्हणून... "
"तू.. म्हणून सिगारेट? बोल ना माझ्याशी... काय वाटतंय ते... असं मनात दडून ठेवशील तर डोकं गरगरेलच... "
"काय बोलू मी शिवानी? आज असे वाटतंय मोठे काही सांगून गेलेत ते खरंच आहे... दिसते तसे नसते म्हणून तर जग फसते... मी चुकलो शिवानी... मी शहनिशा करायला हवी होती होकार कळवन्या आधी..."
"रंजीत मला ठाऊक आहे, आपण जे काही सत्य ऐकले ते भयानक आहे पण आपण त्यांच्या बाजूने हि विचार करायला हवा..." शिवानी त्याला समजूत घालवू पाहू लागली...
"तूच विचार कर शिवानी... आज च्या काळात कोण इतक्या मोठ्या कुटुंबात राहते..?? ते हि मुंबईत? सगळे किती खुश वाटत होते, त्यांच्यात प्रेम होते. मोठ्यांसाठी आदर होता... मला तर आता सर्व ऐक भयानक फसवी वाटत आहे, ते लग्नच खर्च त्यांना देणे... कोणाची ट्रीटमेंट करणार? कि स्वतः गिळणार?" रंजीत चा आवाज चढत होता, त्याला स्वतःचीच चीड येत होती...
"श..श ... शांत हो... मला माहित आहे आता तुझ्या मनात काय वादळ उठलंय... पण आपण आहोत ना अजून रुपाली ला काही हि होऊ देणार नाही आपण... देव आहे आपल्या पाठीशी..."
"आपण विचारले नसते तर त्यांनी सांगितले हि नसते... " रंजीत चे डोळे पाणावलेले.. शिवानी नि ओळखले कि त्याचा बांध कोणत्याही क्षणी फुटेल..
"हे बघ रंजीत मला काय वाटते, आपण एक्दम टोकाची भूमिका नको घ्यायला... "
"... टोकाची भूमिका?? तुला आठवते आपण तो ऐक एपिसोड पहिला होता त्यात ऐक मुलगा आणि त्याचा परिवार असच गरजू मुलींशी लग्न करतात त्यांचे पैसे लुबाडतात आणि तिला मारून मग दुसऱ्या मुलीशी लग्न करतात... हि तशीच टोळी असली तर?? माझं मन अशांत होत आहे गं... नाही नाही... वाचवले आज देवानी..."
रंजीत ला असे बघून त्याला सावरायला शिवानी विचार करू लागली, "हे बघ रंजीत असं काही असतं तर त्यांनी खरं सांगितलं असत का? त्यांनी काही हि करणं सांगितलं असते उलट त्यांनी विचार पूर्वक सगळं ठरवून सांगितलं असतं, नाही का?"
रंजीत ला तिच्या बोलण्यात सत्यता वाटली, "हम्म, ते आहे!" तो गहाण विचार करून म्हणाला."पण नाही मला मुंबई ला जावे लागेल... "
"हो आपण सर्व जाऊ, २ महिने तिकडेच जाऊ"
"२ महिने... नाही नाही.. आधी  मी जाऊन बघून येतो... सर्व ठीक असेल तर मी तुम्हाला बोलवेल, काही गडबड असेल तर लग्न तर होणारच नाही आहे ..."
"मी तुला एकट्याला नाही जाऊ देणार, तू बघ किती काळजी करतोस आणि टेन्शन घेतोस...आणि तिथे मुंबई मध्ये कस राहशील...नाही मी पण येणार" शिवानी हट्ट धरते.. रणजित ठीक आहे म्हणतो...
रंजीत मुंबई चे तीन तिकीट घेऊन येतो... "तीन? का? आपण दोघेच जाणार आहोत ना..."
"आपण जाणार तर रुपाली इथे काय करणार.. तिला हि घेऊन जाऊ... " रणजित आज फ्रेश वाटत होता... "ईकडले सर्व आवरा आवारी  करून कामाचे ठाव ठिकाणे लावून मग निघावे लागेल. तिकीट मिळत नव्हते... त्या मोरे ला सांगून त्याच्या मागे लागून मिळवावे लागले तिकीट. १५ दिवस आहेत."

..... तिघे मुंबईत येऊन पोहचले... रुपाली आणि रणजित पहिल्यांदाच मुंबईत आले होते. त्यांनी स्टेशन च्या जवळच ऐक छान स्वस्त हॉटेल २ दिवस साठी घेतले.
"देसाई काकांना फोन कर आणि सांग आपण आलोय ते... " शिवानी रंजीत ला म्हणाली...
"त्यांना कळवायचे असते तर तिकीट काढले तेव्हाच कळवले असते ना... त्यांना कळू न देता मला सर्व माहिती काढायची आहे... " रंजीत आपली हेरगिरी दाखवत म्हणाला. शिवानी मान हलवत ठीक आहे म्हणाली.. .
"तुम्ही दोघी आराम करा तो पर्यंत मी जरा खाली फेर फटका मारून येतो... " शिवानी किंवा रुपाली काही बोलेल त्या आधी रंजीत निघालेला हि असतो.
थोड्याच वेळात तो परत येतो... जरा निराश दिसतो शिवानी त्याला काय झाले विचारते, "काय लोक आहेत यार इथली, कोणाला भावच नाही देत... मी ऐक आवाज दिला कि आपल्या गावात लोकांची लाईन  लागायची... आणि इथे माझा आवाज तर कोणाच्या कानावर हि नाही पडत..."
"नीट सांगशील का काय झाले ते?" शिवानी ला काही कळले नाही तो काय बोलतोय...
"अजून काय सांगू... मी लोकांना पत्ता विचारतोय कोणी सांगायला तयार नाही... "
"अरे दादा लोकांना विचारायला जायची काय गरज आहे... गूगल आहे ना.. " असे म्हणत रुपाली मॅप्स लावते आणि आण इकडे दे पत्ता म्हणते... ती त्यावर सर्व शोधून त्याला सांगते, "हे बघ इथून २२ क.मी. आले हे आणि कधी निघायचे आहे ते सांग मी कॅब बुक करते..." रंजीत आश्चर्याने तिच्याकडे बघत राहतो... "रुपाली.. तुला हे सर्व कसं माहित?"
"सोपं आहे दादा नवीन नवीन टेकनॉलॉजि सोबत आपण जोडून राहील पाहिजे नवीन गोष्टी अनुभवत राहिल्या पाहिजेत... "
"बरं बरं ठीक आहे... चला तुम्ही तयार व्हा मग आपण निघू...."
"कुठे?" रुपाली विचारते...
"जायचे नाही का देसाईंकडे?"
"कशाला?"
"कशाला म्हणजे? त्यांची चौकशी नको का करायला?" रंजीत गोंधळून म्हणाला...
"हे बघ मी सगळी माहिती काढली आहे... हे सर्व त्यांचे फोटोस... ते त्याचे परिवार चेच लोक आहेत... म्हणजे त्याचा खरंच इतका भला मोठा परिवार आहे... आणि ते सर्व एकत्र राहतात"
"आता हे सगळे फोटो तुला कुठून मिळाले..."
"सोपं आहे रणजित फेसबुक !!" शिवानी रुपाली ची साथ देत म्हणाली...
"म्हणजे तुम्ही तर हि माहिती सगळी आधीच काढून ठेवली होती... मग आपण मुंबई ला कशा साठी आलोय? हे सर्व तुम्ही मला घरी नव्हते सांगू शकत का?" रंजीत जरा चिडला...
"घरी सांगितलं असतं तर तू आम्हाला मुंबई ला अणलच नसतं... सारखा ते आपलं काम काम ... हो ना रे ध्रुव??"
ध्रुव पण मान हलवून हो म्हणतो... "चला आज आपण समुद्रावर जाऊ... " रुपाली ध्रुव ला म्हणते...
"समुद्र?? म्हणजे बीच वर?? ते टीव्ही वर दाखवतात तसं?" ध्रुव आनंदाने म्हणाला...
"हो सोन्या...." शिवानी त्याला तयार करायला घेत म्हणते..
"अगं पण या वरून काय... देसाई... जाऊन..." रणजित ला काही बोलू न देता शिवानी त्याला डोळ्याने इशारा करते शांत रहायला... "मी सर्व बघेन... तू काळजी नको करू.."

संध्याकाळी सर्व चौपाटी वर जातात तिथे रेतीत रुपाली आणि ध्रुव मिळून घर बनवतात शिवानी आणि रंजीत त्यांना मदत करतात, भेळ, पाणी पुरी खाऊन मग ध्रुव आणि रुपाली समुद्रात खेळायला जातात,
"माऊ समुद्र किती मोठा आहे... किती लांब आहे..." ध्रुव आपल्या हात लांब करून त्याला मोजण्याचा प्रयत्न करत म्हणतो... रुपाली त्याला हो रे हो रे करत उत्तरं देते आणि दोघे पाण्यात खेळतात...

शिवानी बीच वर रंजीत सोबत रेतीचे खोपे करत बसली असते... "शिवानी तू आज जायला का नाही म्हटले...?"
"तू रुपाली च्या चेहऱ्यावरचा आनंद पाहिलास? मला तो हिरावून नव्हता घ्याचा... तू आणि मी जितका भयानक विचार करतोय त्या विचाराने तिला अजून शिवले हि नाही ... आपण चूक हि असू शकतो नाही का... मग आधीच का तिचे मन तिच्या सासरच्यांबद्दल आपण कालवायचे... ??"
"बरोबर म्हणतेस... म्हणून तर मी एकटा पुढे येणार होतो ना... मग आता आपण काय करायचं?"
"उद्या असच ह्या दोघांना कोणत्या तरी स्पॉट वर पाठवू आणि आपण जाऊ वरली ला देसाईंचे घर बघायला... ठीक आहे?"

आता कुठे रंजीत च्या चेहऱ्यावर हसू आले... आणि तो रुपाली आणि ध्रुव च्या मागे धावून पाण्यात खेळू लागला... शिवानी सर्वांना आनंदाने खेळताना बघून स्वतः आनंद अनुभवत होती...

.. उद्या त्यांच्या समोर काय सत्य उलगडेल या भीती ला वाऱ्यावर ठेवून सर्व जण आज च्या क्षणात रमलेले.. .

क्रमश:
------------------

फ्रेंड्स कशी वाटली आता पर्यंत ची कथा? काय वाटते तुम्हाला?

No comments:

Post a Comment

तुझ्या सोबतीची वाट...

 तुझ्या सोबतीची वाट... भगवद गीता- आपला धर्म ग्रंथ, पण ती कधी वाचावी, शिकावी त्यात भगवंतांनी काय सांगितले आहे हे जाणून घ्यावे मला कधीच ह्याचे...